श्रीक्षेत्र पद्मालय शिर्डी बससेवेचा आमदार अमोल पाटील यांचेहस्ते शुभारंभ.

प्रतिनिधी एरंडोल-श्रीक्षेत्र पद्मालय (एरंडोल) ते शिर्डी बससेवेचा शुभारंभ आमदार
अमोल पाटील यांचेहस्ते करण्यात आला.एरंडोल बसस्थानकावरून शिर्डी बससेवा
सुरु झाल्यामुळे भाविकांची होणारी गैरसोय दूर झाली असून प्रवाशांमधून
समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

एरंडोल शिर्डी बससेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी शिवसेना
पदाधिका-यांनी आमदार अमोल पाटील यांचेकडे केली होती.देशभरातील लाखो
भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तसेच ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्व
असलेल्या श्रीक्षेत्र पद्मालय (ता.एरंडोल) येथे दररोज हजारो भाविक
दर्शनासाठी येत असतात.पद्मालय ते शिर्डी बस सुरु करण्यासाठी माजी आमदार
चिमणराव पाटील यांचेसह आमदार अमोल पाटील यांनी पाठपुरावा केला होता.आमदार
अमोल पाटील यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेवून बसस्थानक
आणि आगाराचे सुशोभिकरण करण्यात यावे तसेच आगारासाठी नवीन बसेस उपलब्ध
करून द्याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली होती.श्रीक्षेत्र पद्मालय
(एरंडोल) ते शिर्डी या बससेवेचा शुभारंभ आमदार अमोल पाटील यांचेहस्ते
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला.यावेळी
बसचे चालक व वाहक यांचा सत्कार करण्यात आला.सदर बस सकाळी सात वाजता
एरंडोल बसस्थानकावरून सुटून दुपारी एक वाजता शिर्डी येथे पोहोचणार आहे.या
बससेवेमुळे शिर्डीसह नांदगाव,येवला,कोपरगाव परिसरातील भाविकांची होणारी
गैरसोय दूर होणार आहे.सदर बस श्रीक्षेत्र पद्मालय,एरंडोल,भडगाव,कोळगाव
गुढे,बहाळ,मेहुणबारे,दरेगाव,पिलखोड,सायंगाव,नांदगाव,येवला,कोपरगाव आणि
शिर्डी या मार्गाने जाणार असल्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा
मिळणार आहे.आगामी काळात एरंडोल बसस्थानकासह आगाराचे सुशोभिकरण करण्यात
येणार असल्यामुळे सौंदर्यात भर पडणार असल्याचे आमदार अमोल पाटील यांनी
सांगितले.परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास सुरक्षित प्रवास असल्याचे
सांगितले.कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,युवा
उद्योजक समाधान पाटील,आगार व्यवस्थापक निलेश बेनकुळे,बसस्थानक प्रमुख
गोविंदा बागुल,योगिता बं-हाटे,विजय पाटील,पी.यु.बाविस्कर यांचेसह
पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.श्रीक्षेत्र पद्मालय ते शिर्डी बससेवा
सुरु झाली असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा तसेच महामंडळाच्या बसनेच
प्रवास करावा असे आवाहन आगारप्रमुख यांनी केले आहे.दरम्यान एरंडोल येथून
मुंबई,नागपूरसह परराज्यात बससेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी प्रवासी
वर्गातून करण्यात येत आहे.