जळगावमहाराष्ट्र

समाजाला नविन दिशा मिळावी या साठी बुद्धांचे विचार अनमोल – आमदार. अमोल चिमणराव पाटील.

प्रतिनिधी – एरंडोल समाजाला नविन दिशा मिळावी या साठी बुद्धांचे विचार अनमोल असून भगवान गौतम बुद्धांचे विचार घराघरापर्यंत पोहोचवा असे प्रतिपादन आमदार अमोल चिमणराव पाटील यांनी एरंडोल येथे केवडी पुरा येथे आयोजित भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले .नंतर वीर एकलव्य यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करण्यात आले .शहरातून शांततेत व शिस्तीत मिरवणूक काढण्यात आली.यावेळेस बोलताना आमदार अमोल पाटील म्हणाले की भगवान गौतम बुद्धांसह महापुरुषांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे यांना मर्यादित ठेवता कामा नये. महापुरुषांच्या जयंती व इतर कार्यक्रमांमध्ये व्याख्यानमाला व प्रवचनच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे. माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनीही भगवान गौतम बुद्ध हे शांतीचा संदेश देणारे होते. तसेच त्यांच्या विचारांवर यांच्या जीवनावर अतिशय चांगल्या पद्धतीने विचार मांडले. बाजार समितीचे सभापती शालिग्राम गायकवाड यांनी भगवान गौतम बुद्ध यांच्यावर विचार व्यक्त करून समाजासाठी माजी आमदार चिमणराव पाटील व आमदार अमोल पाटील यांनी संसद भवन व विपश्यना केंद्रासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.यावेळी प्रा भरत शिरसाठ यांनीही मनोगत व्यक्त केले. रॅलीतील सर्वांनी पांढरे वस्त्र परिधान केले होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या कडून खीर दान करण्यात आली.
याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तहसीलदार प्रदीप पाटील,पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड,सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर पवार,रोहिदास गवाले,मुख्याधिकारी अमोल बागुल,माजी नगरसेवक सुरत सुरेश सोनवणे,प्रा.मनोज पाटील, धरणगांव बाजार समितीचे मा.सभापती शालिकग्राम गायकवाड,आनंद दाभाडे, विठ्ठल आंधळे, माजी नगरसेवक डॉ. नरेंद्र ठाकूर, जावेद मुजावर, ईश्वर बिराडे माजी नगरसेवक प्रमोद महाजन,अल्पसंख्यांक आघाडीचे शहरप्रमुख अमोल तंबोली, सुरेश दाभाडे, प्रविण केदार यांचेसह आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वितेसाठी बुद्ध पौर्णिमा उत्सव समिती चे अध्यक्ष राजेश बोरसे, उपाध्यक्ष मयुर अहिरे,खजिनदार अभिषेक शिंदे,उप खजिनदार भुषण बोरसे,सचिव सागर बोरसे,सहसचिव अमोल शिंदे,आकाश इंगळे,संपर्क प्रमुख अमोल बोरसे,सह संपर्क प्रमुख दिनेश सरदार,कार्याध्यक्ष जितेंद्र बोडरे,उप कार्याध्यक्ष आदित्य बोरसे, सहकार्याध्यक्ष राहुल बोडरे,प्रकाश शिंदे,रवींद्र बोरसे,नितीन बोरसे,अनिल बोडरे,सुभाष गायकवाड,मनोज बोरसे, दिनेश बोरसे,भीमनगर मित्र परिवार,ब्लू बॉईज ग्रुप,पंचशील मित्र मंडळ,राजे संभाजी ग्रुप,रमाबाई आंबेडकर नगर,वीर एकलव्य ग्रुप , आंबेडकरी चळवळीचे सर्व प्राध्यापक,शिक्षक,समस्त बौद्ध समाज यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button