जळगावमहाराष्ट्र

प्रमोद पाटील यांना  उल्लेखनीय सामाजिक कार्यासाठी ‘ समाज भुषण पुरस्कार ‘ प्रदान………!

एरंडोल – युवा किर्तनकार ह.भ.प. दिनेश महाराज फरकांडेकर यांच्या वैचारिक स्वराज्य या संस्थेतर्फे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष व जेष्ठ पत्रकार प्रमोद पाटील यांना त्यांच्या समाजहितांच्या अनेक उपक्रमांची दखल घेऊन २१ मे २०२५ रोजी कोठली ता.भडगाव येथील जाहीर भव्य कार्यक्रमात एकनाथ महाराजांचे वंशज डाॅ.ह.भ.प.पुष्कर महाराज गोसावी यांचे हस्ते ‘ समाज भूषण पुरस्कार ‘ प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार महेंद्रबापू पाटील हे होते.याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रमोद पाटील हे नेहमी सामाजिक हितांच्या कामांसाठी स्वतःला वाहून घेतात. पत्रकार देखील असल्याने जनसमस्या पोटतिडकीने व निर्भयपणे मांडणे, समाजात घडणाऱ्या प्रेरणादायी घटनेचे वृतांकन करणे हा त्यांचा आवडता छंद.कासोद्यात सहकाऱ्यांच्या मदतीने ग्रीन आर्मी संस्थेतर्फे वृक्षारोपण करणे,त्यांच्या संरक्षणासाठी लोक वर्गणीतून ट्रिगार्डसह उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करणे, बिजारोपण यासारखे उपक्रम त्यांनी सातत्याने राबवले आहेत.
कासोद्यात गॅस दूर्घटना घडल्यानंतर अचानक येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी दानशूर गृप सुरू केला आहे, गृपचे बैंकेत खाते उघडवून त्या स्कॅनरद्वारे दानशूर लोकांसाठी दरमहा १०० रुपये या खात्यात जमा करण्याचे आवाहन केले,या त्यांच्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद कासोदेकर जनतेने दिला आहे.विशेष म्हणजे त्यांनी उपक्रमातील आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवला आहे.
रेल्वे दूर्घटनेत आदिवासी तरुणाच्या झालेल्या मृत्यूनंतर त्याच्या आईवडील व विधवेला रेल्वे कोर्टाकडून वकीलामार्फत मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी सतत पाठपूरावा सुरु ठेवला आहे.रक्तदान शिबीरे, धर्मजागृतीसाठी अपर्णाताई रामतिर्थकर यांचे व्याख्यान, गावात सभागृहासह मंदिर उभारणीसाठी लोकसहभागातून गावकऱ्यासोबत पूर्णत्वास नेणेपर्यंत परिश्रम घेतले.
वयात येणाऱ्या मुलामुलींच्या प्रबोधनासाठी कासोदा पोलीस व जनतेच्यावतीने गावात झालेल्या वसंत हंकारे यांच्या कार्यक्रमांत तो यशस्वी होणेसाठी मोलाचा सहभाग त्यांनी नोंदवला.तसेच आरोग्य शिबीरे,आधुनिक शेतीसाठी कृषीतज्ञांना गावात आणून जनजागृती शिबीर, शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती तज्ञांचे मार्गदर्शन मोफत देणे,जल तारा योजनेचा प्रसार प्रचार करणे,कोरोना काळात वयाचा विचार न करता जे जे शक्य ते योगदान देणेचा त्यांचा प्रयत्न जनतेने अनुभवला आहे.
अशी अनेक समाज हिताची कामे करतांना ते कटाक्षाने आर्थिक देवाणघेवाणीपासून ते सदैव लांब राहिले आहेत.त्यांच्या या निस्पृह व सेवाभावी अशा कार्याची दखल समाज नेहमी घेत असतो.प्रमोद पाटील यांच्या या असामान्य कर्तृत्वाची दखल घेत वैचारीक स्वराज्य या संस्थेतर्फे त्यांना ‘ समजभूषण पुरस्कार ‘ देऊन गौरविण्यात आले.कासोदा व एरंडोल परिसरातील सर्व पत्रकार,त्यांचे मित्र परिवार व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button