क्राईमजळगावमहाराष्ट्र

दुचाकी लावण्याच्या वादातून युवकासह ४-५ जणांना जबर मारहाण,

प्रतिनिधी :  एरंडोल येथील गाढवे गल्ली परिसरात मोटरसायकल लावण्याच्या वादातून अमोल कैलास पाटील ( वय-३१ ) याच्यासह कुटुंबातील ४ते ५ जणांना लाठ्याकाठ्यांनी व लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केल्याची घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. यात अमोल पाटील हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
या घटनेबाबत एरंडोल पोलिस स्टेशनला रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला असून प्रमुख आप्पा पाटील यास ताब्यात घेण्यात आले असल्याचे समजले.

पोलिस उपविभागीय अधिकारी अमळनेर विनायक कोते यांनी रात्री एरंडोल पोलिस स्टेशनला भेट देऊन घटनेची माहिती घेतली.

२५ मे २०२५ रविवार रोजी अमोल याने नागदुलीहून ड्युटी संपवून घरी आल्यावर त्याची दुचाकी घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लावल्याच्या कारणावरुन तुकाराम उर्फ अप्पा सिताराम पाटील, रोहित उर्फ बंटी तुकाराम पाटील, आशिष उर्फ आशू तुकाराम पाटील, दिपक उर्फ गोलू नामदेव पाटील, उषाबाई तुकाराम पाटील सर्व रा.गाढवे गल्ली एरंडोल यांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

या सर्व आरोपींनी एकत्र येऊन रोहित उर्फ बंटी व आशिष उर्फ आशू यांनी अमोल पाटील यास शिवीगाळ करत त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच अमोल यास काँक्रिटिकरण झालेल्या रस्त्यावर जोरात आपटून त्याचे डोके फोडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. भांडण सोडवित असताना सचिन कैलास पाटील, संजय पाटील, दिपाली पाटील,जयेश पाटील यांना ही चापटया बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली.
पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड हे पुढील तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button