जळगावमहाराष्ट्र

एरंडोलच्या डिजिटल आठवडे बाजारातील ओट्यांचा लिलाव रद्द.

प्रतिनिधी एरंडोल-पालिकेच्यावतीने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या श्रीसंत शिरोमणी सावता महाराज डिजिटल आठवडे बाजारातील गाळ्यांचा
वापर केला जात नसल्यामुळे पालिकेने ओट्यांची लिलाव प्रक्रिया रद्द करून संबंधितांना नोटीसा दिल्यामुळे खळबळ उडाली आहे.

      शहरातील बुधवार दरवाजा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलाच्या मागील बाजूस पालिकेतर्फे सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून
अत्याधुनिक आठवडे बाजाराचे बांधकाम करण्यात आले होते.आठवडे बाजारात विक्रेत्यांसाठी ९८ बाजार ओटे बांधण्यात आले.बांधकाम करण्यात आलेल्या ओट्यांचा तीन वर्षांपूर्वीच लिलाव करण्यात आला होता.लिलाव प्रक्रियेत भाग घेणा-या व्यावसायिकांनी तीन वर्षांचा कालावधी उलटून देखील याठिकाणी व्यवसाय सुरु केला नाही तसेच  भाडे देखील भरलेले नाही.तीन वर्षांचा कालावधी उलटून देखील आठवडे बाजारात व्यवसाय सुरु केलेला नसल्यामुळे तसेच
पालिकेला भाडे भरलेले नसल्यामुळे पालिका प्रशासनाने लिलाव प्रक्रिया रद्द करून संबंधी गाळेधारकांना नोटीसा पाठवल्यामुळे खळबळ उडाली आहे.सदर आठवडे
बाजाराचे बांधकाम करण्यापूर्वी याठिकाणी दर रविवारी आठवडे बाजार भरला जात होता.आठवडे बाजारात शेकडो भाजीपाला विक्रेत्यांसह अनेक लहान व्यावसायिक
विविध प्रकारच्या जिवनावश्यक वस्तूंचे दुकाने लावत होते.आठवडे बाजाराच्या बांधकामामुळे शहरातील दर रविवारी भरणारा बाजार प्रमुख रस्त्यावर,डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील व्यापार संकुलातील
रस्त्यावर तसेच म्हसावद नाका परिसरात भरवण्यात येत आहे.पालिकेच्यावतीने सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्च करून श्रीसंत शिरोमणी सावता महाराज आठवडे
बाजाराचे बांधकाम केले.डिजिटल आठवडे बाजाराचे बांधकाम करण्यात आल्यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडली.मात्र आठवडे बाजारातील ओट्यांच्या लिलाव
प्रक्रियेत सहभागी झालेल्या ओटेधारकांनी तीन वर्षात कोणताही व्यवसाय सुरु केला नाही.सद्यस्थितीत आठवडे बाजाराची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून
याठिकाणी मोकाट कुत्रे व डुकरांचा मुक्त संचार असुन अंमली पदार्थ सेवन करणा-यांची गर्दी दिसून येते.आठवडे बाजारातील ओट्यांच्या लिलाव प्रक्रियेत सर्वसामान्य शेतकरी,विक्रेत्यांऐवजी धनदांडग्या व्यक्तींनी
उच्च बोली लाऊन सहभाग घेतल्याचे समजते.लिलाव प्रक्रियेत सहभागी झालेल्या गाळेधारकांनी आठवडे बाजारात व्यवसाय सुरु केला नाही तसेच पालिकेचे भाडे
थकीत ठेवल्याच्या कारणावरून पालिकेने केलेल्या लिलाव रद्दच्या कारवाईचे सर्वसामान्य विक्रेत्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.पालिकेने आठवडे बाजारातील ओटे भाजीविक्रेते तसेच जिवनावश्यक वस्तूंची विक्री करणा-या
सामान्य विक्रेत्यांना द्यावेत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button