जळगावमहाराष्ट्र

महाराष्ट्र मंगल कलश यात्रेचे जल्लोषात स्वागत

प्रतिनिधी – महाराष्ट्र दिनाच्या औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने आयोजित केलेली मंगल कलश यात्रा दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी मुक्ताईनगर येथून भव्य आणि दिव्य स्वरूपात प्रारंभ झाली ही यात्रा पक्षाच्या सामाजिक संस्कृती व राजकीय बांधलकीचे प्रत्यक्ष दर्शन घडवत आहे महाराष्ट्राच्या समृद्धी परंपरेच्या अभिमान बाळगून विविध गावातून जनतेपर्यंत पोहोचण्याच्या उद्देश या यात्रे मागे आहे
   एरंडोल येथे मंगल कलश यात्रेच्या आगमना प्रसंगी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री व आ. अनिल पाटील जिल्हाध्यक्ष संजय पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमित पाटील, डॉ. सुरेश पाटील , किसान सेल जिल्हाप्रमुख ईश्वर पाटील माजी नगरसेवक अभिजीत पाटील , गोरख चौधरी, योगेश देसले यांनी जल्लोषात स्वागत केले.

राष्ट्रीय आय काँग्रेस पक्षाला खिंडार

     या प्रसंगी एरंडोल तालुका शहर राष्ट्रीय आय काँग्रेस पक्षाच्या  दहा ते पंधरा पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी आ. अनिल पाटील , संजय पवार , अमित पाटील , डॉ. सुरेश पाटील ,  योगेश देसले व किसान सेल जिल्हाप्रमुख ईश्वर पाटील माजी नगरसेवक अभिजीत  पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला . यावेळी राजूभाऊ चौधरी यांची एरंडोल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल तालुका प्रमुख पदी निवड करून यांना शुभेच्छा देऊन एरंडोल तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगल कलश यात्रेच्या सोबत जिल्ह्यातील प्रमुख नेते माजी मंत्री अमळनेर विधानसभेचे आ. अनिल पाटील जळगाव जिल्हा अध्यक्ष संजय दादा पवार जिल्हा कार्याध्यक्ष योगेश भाऊ देसले रावेर ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र पाटील उत्तर महाराष्ट्र युवती काँग्रेस ताई साहेब जिल्हाध्यक्ष अभिलाषा रोकडे दादासाहेब ज्ञानेश्वर महाजन धरणगाव किसान सेलचे जिल्हाप्रमुख ईश्वर दादा पाटील व किशोर भाऊ पाटील खर्ची तसेच जिल्ह्याचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button