सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू न केल्यास शेतकरी करणारा आंदोलन.

अमळनेर : तालुक्यात सीसीआय कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कापूस महामंडळाची उदासीनता दिसून आली. जिल्हाधिकारीना देखील फारसा प्रतिसाद न दिल्याने शेतकरी नेते औरंगाबाद येथील कार्यालयात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
जळगाव जिल्ह्यात ११ सीसीआय केंद्र सुरू आहेत. मात्र अमळनेर सारख्या मोठ्या तालुक्यात सीसीआय केंद्र सुरू झालेले नाही. खासदार आणि आमदार दोघांनी पत्रव्यवहार करूनही कापूस महामंडळ सकारात्मक प्रतिसाद देत नाही. अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती व संचालकांनीही मागणी केली होती.
कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कापूस महामंडळ प्रत्येक वेळी प्रत्येकाला वेगवेगळे उत्तर देत असल्याने इच्छाशक्तीचा अभाव दिसून येत आहे.
याबाबत प्रा सुभाष सुकलाल पाटील , शरद पांडुरंग पाटील , सुरेश पिरन पाटील , दिनेश उत्तमराव पवार , बाजार समिती सचिव डॉ उन्मेष राठोड , सुनील सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेतली. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातून कापूस महामंडळ कार्यालयात फोन केला असता अमळनेर पासून पारोळा धरणगाव ही दोन केंद्रे जवळ आहेत आम्ही ५० किमी अंतरावर केंद्र देत नाही असे उत्तर दिले.
दरम्यान कासोदा ,पारोळा ,धरणगाव ही केंद्रे २० किमी परिसरात आहेत मग अमळनेर केंद्रालाच ५० किमीचे निकष का लावण्यात येत आहेत? याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बाजार समिती संचालकांशी चर्चा करून सर्वांना सोबत घेऊन औरंगाबाद येथील कापूस महामंडळ कार्यालयात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रा सुभाष पाटील यांनी दिला आहे.