खाजगी वाहनांवर “भारत सरकार, महाराष्ट्र शासन , पोलीस, लिहणाऱ्यांवर कारवाई करा- दिपक पाचपुते.

विशेष प्रतिनिधी अहमदनगर- जिल्ह्यात सर्रास पोलीस अधिकारी/कर्मचारी व शासकीय अधिकारी/कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक हे त्यांच्या खाजगी वाहनावर भारत सरकार,महाराष्ट्र शासन, व पोलीस अशी लाल रंगाची पाटी लावून त्यांचे वाहन चालवितात.असा नियमच नसुन उलट ते मोटार वाहन कायद्याच्या विरोधी असल्याने अशा सर्व संबंधितांवार दंडात्मक कारवाई करण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक पाचपुते यांनी केली आहे.
पाचपुते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक , उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अहमदनगर व श्रीरामपूर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे , की यापुर्वीच राजवर्धन पोलीस सह आयुक्त – वाहतूक, मुंबई व विजय साबळे कक्ष अधिकारी गृह विभाग यांनी परिपत्रक काढून सूचना दिल्या होत्या.
मोटर वाहन कायद्यानुसार खाजगी वाहनावर नियमबाह्य पोलिस, प्रेस,पत्रकार , वकील, डॉक्टर, खासदार, आमदार, नगरसेवक, नगर अध्यक्ष, सरपंच,न्यायाधीश, महाराष्ट्र शासन, राज्य सरकार, केंद्र सरकार लिहीणे . नियमबाह्य नंबर प्लेट लावणे,कर्कश आवाज येईल असा हॉर्न बसवणे,गाडीवर मजकूर लिहणे असे फलक खाजगी वाहनावर लावण्यासाठीची परवानगी या कार्यालयाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा वाहनांची संख्या निरंक आहे. अशी माहिती यापूर्वी संदीप खडसे जन माहिती अधिकारी तथा सहा, प्रादेशिक परिवहन अधिकारी अहमदनगर दिली असून.
मोटार वाहन कायद्याच्या कलम 80 (a)/177, कलम 50 आणि 55 नुसार वाहनाच्या नोंदणीकृत नंबर प्लेटवर काहीही लिहिणे किंवा चिकटवणे बेकायदेशीर असले.तरी, स्टिकर्सच्या इतर भागांवर स्टिकर्स वापरण्यास प्रतिबंध नाही.त्याशिवाय वाहनाचा रंग किंवा डिझाइन बदलू नये, असे सह परिवहन आयुक्त श्री टी. रघुनाथ यांनी सांगितले.