जळगावमहाराष्ट्र

आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल जितेंद्र पाटील यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित

प्रतिनिधी – जितेंद्र केवलसिंग पाटील (अध्यक्ष – आरोग्यम् धनसंपदा फाउंडेशन) यांना आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला .

सदर कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई या संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे , उद्योगपती नानजी भाई ठक्कर , मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रविण सपकाळे , मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाध्यक्ष दिलिप सपाटे व नितीन शिंदे, प्रदेश संघटक ठाणे येथील कोर्ट नाका या ठिकाणी करण्यात आला होता.

आपण समाजाचे आणि राष्ट्राचे एक जबाबदार घटक असुन समाज ऋण व राष्ट्र ऋण फेडण्याचे महनीय कार्य करीत आहात. आपल्या कार्य कर्तुत्वद्वारे सदैव राष्ट्राभिमान जागृत व्हावा व ज्ञानवृद्धी होऊन देशाला प्रगतीपथाकडे नेण्यास आपले योगदान सदैव लाभावे, अशा भावना मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल्या.सामाजिक क्षेत्रातील अतिशय उत्तम अशा कामगिरीसाठी व सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून जनसेवा हीच ईश्वरसेवा याचे समाजासमोर मुर्तिमंत उदाहरण असल्याचे आपल्या कार्याने दाखवुन दिल्याने सदर पुरस्कारासाठी आरोग्य क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्तींकडुंन जितेंद्र पाटील यांचे नाव सुचविण्यात आले होते.

       कोरोनाव्हायरस सारख्या संसर्ग आजारामुळे जनता भयभीत झालेले असतांना अशा संकटसमयी मोफत जेवण उपलब्ध करून देणे, धान्य, शिधा व गरजेच्या वस्तु मोफत वाटप करणे , रक्तदान व मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करणे, अतिशय अल्प दरात रुग्णवाहिका सेवा ऊपलब्ध करून देणे, अनाथ आश्रमामधिल मुलांना दैनंदिन लागणारे साहित्य व जेवण पुरविणे, अपंगांना जयपूर फूट, कॅलिपर सायकल वाटप करणे. अशा आणि यासारख्या विविध उल्लेखनीय कामगिरीसाठी जितेंद्र पाटील यांना आत्तापर्यंत ५ आंतरराष्ट्रीय आणि १५० राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित करण्यात आलेले आहे.

सदर पुरस्कार जितेंद्र पाटील यांना प्रदान करण्यात आल्याने उत्तम कार्य करणाऱ्या व योग्य व्यक्तीला देण्यात आल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त करुन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button