जळगावदेश-विदेशमहाराष्ट्र

राज्य महामार्ग रस्त्याने घेतला मोकळा श्वास..

प्रतिनिधी एरंडोल:-येथे मुख्य रस्त्यावर आठवडे बाजाराच्या दिवशी धरणगाव चौफुली पासून ते म्हसावद नाक्यापर्यंत मुख्य रस्त्यालगत कोणीही दुकाने लावू नये या पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला१९ जानेवारी २०२५ रविवार रोजी भरलेल्या आठवडे बाजार प्रसंगी विक्रेत्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला त्यामुळे सदर मुख्य मार्गावरील वाहतूक दिवसभर सुरळीत राहिली.
                 दरम्यान नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विक्रेते व फेरीवाल्यांना पर्यायी जागा देण्या कामे दिवसभर परिश्रम घेतले. रा.ती. काबरे विद्यालयापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत  तसेच फुले आंबेडकर व्यापारी संकुलापासून वैष्णवी हॉटेल पर्यंत, आठवडे बाजार भरला होता. तर बाजार ओटा स्थळावर सुद्धा काही विक्रेते दुकाने थाटून बसली होती. एकंदरीत आठवडे बाजाराला काही प्रमाणात सुधारणा व थोड्या प्रमाणात शिस्त दिसून आली.
                       एरंडोल येथे नगरपालिकेतर्फे बाजार भरणाऱ्या स्थळावर आठवडे बाजार ओटे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे आठवडे बाजारातील विक्रेते व फेरीवाले हे धरणगाव चौफुली पासून ते म्हसावद नाक्यापर्यंत मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने लावून बसत होते त्या रस्त्यावर जड वाहनांसह इतर वाहनांची वर्दळ सुरू असते तसेच बाजार करायला आलेल्या लोकांची गर्दी असल्यामुळे वाहतु कोंडी ची समस्या निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर  प्रिंट मेडियाने बातम्या प्रकाशित करून सदर समस्येवर प्रकाश झोत टाकला. पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी त्याबाबत दखल घेऊन योग्य ती पावले टाकली त्यामुळे मुख्य मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. तसेच आठवडे बाजाराला सुद्धा शिस्त लागली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाच्या प्रतिक्रिया उमटल्या व पोलीस प्रशासनाला व नगरपालिका प्रशासनाला नागरिकांकडून धन्यवाद देण्यात आले. याशिवाय प्रिंट मीडियाला सुद्धा नागरिकांनी  आभार व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button