जळगावमहाराष्ट्र

एसटी च्या भाडेवाढमुळे वाहकांना व प्रवाशांना मनस्ताप……


प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने नुकत्याच केलेल्या भाडेवाढमुळे सुट्टे पैशांअभावी प्रवासी व वाहकांमध्ये वाकयुद्ध होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रवासी व वाहक यांना विनाकारण मनस्ताप होत असल्याचे दिसून येत आहे.
     म.रा.प. प महामंडळ नुकतेच १५% भाडेवाढ केल्यामुळे सुट्या पैशाअभावी नेहमीच असे वाद उद्भवत राहिले तर यातून मार्ग कसा निघेल याबाबत प्रवासी व वाहक हे विचार मग्न आहेत. व्यवहारात १रु. , २ रु. , ५ रु च्या नाणी , व १०/- रुपयाच्या नोटांचा तुटवडा असल्याचे चित्र दिसून येत आहे. कमी अंतराच्या मार्गावर चालणाऱ्या किंवा खेडोपाडी धावणाऱ्या बसेस मध्ये असे प्रश्न नेहमीच उद्भवणार असल्याने काही वाहक लांब पल्ल्यांच्या बस मध्ये ड्युटी करण्यास आग्रही दिसून येत आहे. तसेच महामंडळात वाहक या पदावर बहुतांश महिला असल्याने त्यांना या प्रकाराचा जास्त सामना करावा लागत आहे. कमी अंतराच्या बसेस मध्ये शेतकरी , कामगार , महिला ये – जा करणारे नोकरदार असल्याने त्यांच्याकडे सुटे पैसे नसल्याने वाहक व त्यांच्या काही ठिकाणी शाब्दिक चकमक देखील पहावयास मिळत आहे तरी शासनाने केलेल्या या दरवाढीला कुठेतरी लहान सदर दरवाढ मागे घेऊन योग्य ते भाडे आकारावे अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button