तालुक्यातील जवळपास सर्वच विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी होणार पुस्तकं वाटप.

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील मराठी व उर्दू माध्यमाच्या इयत्ता पहिली ते आठवी या वर्गात शिक्षण घेणा-या सर्व
विद्यार्थ्यांना सुमारे १८ हजार २५० पुस्तकांचे पहिल्याच दिवशी वाटप करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन यांनी दिली.विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचे पूर्ण नियोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरासह ग्रामीण भागातील शासकीय शाळा,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळा अशा १२० शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन यांनी सांगितले.इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी,शाळेत विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती रहावी,कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही या उद्देशाने शासनाच्या समग्र शिक्षा योजने अंतर्गत सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करण्यात येणार
आहे.तालुकास्तरावरून मराठी माध्यम,उर्दू माध्यम,सेमी माध्यमाची पुस्तके शाळा स्तरावर वाटप करण्यात येणार आहे.तालुक्यात मराठी माध्यमाची ६१९९,सेमी माध्यमाची ८७२३ आणि उर्दू माध्यमाची ३३२८ अशी एकूण १८ हजार २५० पुस्तके विद्यार्थ्यांना शाळेत वितरीत करण्यात येतील.यामध्ये इयत्ता पहिली २०१६,दुसरी २०१६,तिसरी २०१६,चौथी २३६७,पाचवी,२६२१,सहावी २५११,सातवी
२३३९ आणि आठवी २३६४ याप्रमाणे मराठी,सेमी व उर्दू माध्यमातील पुस्ताकांचे वाटप करण्यात येईल.विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्याबाबत तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक व गटसाधन केंद्रातील कर्मचारी यांची बैठकघेवून नियोजन करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
वर्गनिहाय पुस्तक वाटप पुढीलप्रमाणे.
मराठी माध्यम-इयत्ता पहिली ४२६,दुसरी ४७८,तिसरी ३६२,चौथी ५३६,पाचवी
१०८१,सहावी ११२७,सातवी ११०५,आठवी १०८४.एकूण ६१९९.सेमी माध्यम-इयत्ता पहिली १२१३,दुसरी ११६१,तिसरी १२७७,चौथी १३७३,पाचवी,१०६१,सहावी ९१९,सातवी ८४१,आठवी ८७८ एकूण ८७२३ उर्दू माध्यम.-इयत्ता पहिली ३७७,दुसरी ३७७,तिसरी ३७७,चौथी ४५८,पाचवी,४७९,सहावी ४६५,सातवी ३९३ आठवी ४०२.एकूण ३३२८.
(कोट)
पुस्तक वाटपाचे योग्य नियोजन.-राजेंद्र महाजन,गटशिक्षणाधिकारी,एरंडोल.
तालुक्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी पुस्तक वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.विद्यार्थी पुस्तकांअभावी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने समग्र शिक्षा योजनेअंतर्गत पुस्तके वाटप करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांची शाळेतील संख्या
वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.