जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्व.दादासाहेब दिगंबर शंकर पाटील यांना ज्ञानमर्मी स्मृती जीवनगौरव सन्मान.

प्रतिनिधी एरंडोल : ग्रामगौरव फाउंडेशनच्या तृतीय वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ नेते व सहकार तसेच शिक्षणमहर्षी माजी आमदार स्व.दादासाहेब दिगंबर शंकर पाटील यांना ज्ञानमर्मी स्मृती जीवनगौरव सन्मान प्रदान करण्यात आला.कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ कृषी व जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव मगर यांच्या शुभहस्ते आणि ज्येष्ठ विचारवंत तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली हा सन्मान झाला.

जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम उभारणाऱ्या महनीय व्यक्तींच्या व संस्थांच्या कामाला उजाळा मिळण्याच्या उद्देशाने ज्ञानमर्मी सन्मान सोहळ्याचे आयोजन होते.सर्व सन्मान झालेल्या शिक्षण पंढरीच्या वारकऱ्यांची प्रेरणागाथा म्हणून काढण्यात येणाऱ्या ‘ज्ञानमर्मी’ विशेषांकाच्या मुखपृष्ठाचे सुद्धा यावेळी अनावरण करण्यात आले.जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन भवनात झालेल्या या देखण्या सोहळ्याला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,जिल्हा दूध संघांचे चेअरमन आ.मंगेशदादा चव्हाण,जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित, डायटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे,उच्च शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल सिंघेल, माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण,जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने,प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील,
सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष शरद जिवराम महाजन मधुस्नेह संस्था परिवाराचे धनंजय चौधरी,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. शैलेश राणे,ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, जैन उद्योग समूहाचे जनसंपर्क विभागाचे उपाध्यक्ष अनिल जोशी,इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ.करीम सालार, उद्योजक रवींद्र नवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

स्व.दादासाहेब दिगंबर शंकर पाटील यांनी एरंडोल व ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल मरणोत्तर ऋणनिर्देश करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्ह्यातील विविध दिवंगत नामवंत व्यक्तीमत्व व विद्यमान अशा 29 शिक्षण संस्थाचालकांना सुद्धा ज्ञानमर्मी सन्मान प्रदान करण्यात आला.

*चौकट :*
*आठवणींना मिळाला उजाळा :*
स्व.दिगंबर दादा हे पंधरा वर्षे विधानसभेचे सदस्य होते. सामाजिक राजकीय व शैक्षणिक कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये  शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक उत्थानाचे कार्य केले. ग्रामीण भागात 1971 ला त्यांनी शैक्षणिक संस्था अतिशय विपरीत परिस्थिती असताना उभारली. त्यामुळे तळागळातील गोरगरिबांच्या मुलांना शहरां प्रमाणेच ग्रामीण भागात शिक्षण मिळाले .त्यांच्या अथक प्रयत्नाने आज हजारो विद्यार्थी या महाविद्यालयातून विविध पदव्या घेऊन उच्च पदावर विराजमान झाले.
त्यांचा वारसा विद्यमान चेअरमन मा. अमीतदादा अतिशय समर्थपणे चालवून संस्थेचे वटवृक्षात रूपांतर केले आहे. त्यांच्या  कार्यकाळात संस्थेच्या कायापालट होताना दिसतो.
संस्थेचे अध्यक्ष तथा स्व. स्व. दिगंबर पाटील यांचे चिरंजीव अमितदादा पाटील व सहकाऱ्यांनी हा सन्मान स्वीकारला.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,प्रा.राजेंद्र पाटील,जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण केदार, गोरख गायकवाड ,शेखर पाटील, नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.



ग्रामगौरव फाउंडेशनचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे,सचिव सुभाष मराठे,क्रिएटिव्ह हेड वीरेंद्र पाटील,मंत्रालय ब्युरो चीफ रवींद्र चव्हाण, दिनेश दीक्षित फाउंडेशनच्या सचिव भाग्यश्री ठाकरे,दिनेश थोरात,सई नलवडे,विकास पाटील, बाळासाहेब पवार,प्रकाश पवार,दस्तगीर खाटीक, आकाश भंगाळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.आनंद शर्मा व तुषार भामरे यांनी तांत्रिक सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानमर्मी उपक्रमाच्या संयोजिका कु.धनश्री ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप केदार यांनी केले, आभार सुनील गरुड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button