निवृत्त शिक्षकांच्या घरी झाली घरफोडी….!

प्रतिनिधी – एरंडोल येथील म्हसावद रस्त्यावरील श्रीराम कॉलनी राहणाऱ्या निवृत्त शिक्षकाच्या घरी चोरट्यांनी ते घरी नसल्याचा फायदा घेत घरफोडी केली परंतु यात त्यांना कुठलाही मुद्देमाल मिळून आला नसल्याने एरंडोल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला नाही.
याबाबत मिळालेली माहिती अशी श्रीराम कॉलनी येथील निवृत्त शिक्षक कैलास वामन चौधरी हे मुंबई येथे आपल्या नातलगांच्या येथे लग्नकार्यासाठी गेले होते त्यामुळे त्यांचे घर गेल्या काही दिवसापासून बंद होते. याच गोष्टीचा फायदा घेत अज्ञात चोरटयाने त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीवरून उड्या मारत आत प्रवेश केला तसेच मागील दाराचा व प्रवेशद्वाराचा कडी कोंयडा टॉमीच्या साह्याने आत प्रवेश केला. घरात शोधाशोध करत घरातील सामान अस्ताव्यस्त केला यात घरातील हॉल , किचन , बेडरूम आदी ठिकाणातील सामान अस्तव्यस्त केले यात सुदैवाने त्यांना काही सापडले नसल्याने खाली हात परत जावे लागले. सकाळी कॉलनीतील रहिवाशांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी लागलीच कैलास चौधरी यांना संपर्क करून घडलेली हकीगत सांगितली. त्यानंतर त्या ठिकाणी एरंडोल पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या कर्मचाऱ्यांनी भेट दिली असता व स्वतः घरमालक कैलास चौधरी यांनी घरातील काही एक वस्तू चोरीस न गेल्याचे सांगितल्याने गुन्हा दाखल केला नाही.
दरम्यान महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी चोरांनी घराचा कोयंडा तोडण्यासाठी वापरलेली सुद्धा पोलिसांना मिळून आली. सदर टॉमी पोलिसांनी जप्त केली असून परिसरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड तथा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आमच्या परिसरात तथा शहरात रात्रीची गस्त सुरू करावी अशी विनंती केली तसेच याच परिसरात काही वर्षांपूर्वी सर्वात पहिला मोठा दरोडा पडला होता यातील आरोपी देखील आजपर्यंत पोलिसांना मिळून आलेले नाहीत तसेच काही दिवसांपूर्वी या परिसरात एका घरातून दूचाकी चोरताना परिसरातील नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केला होता त्याला कुठलीही शिक्षा न होता पोलिसांनी सोडून दिल्याचे देखील बोलले जात आहे. याबद्दल परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लवकरात लवकर रात्रीची गस्त सुरू करावी अशी मागणी जोर धरत आहे याप्रसंगी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांनी परिसरातील नागरिकांना रात्री प्रत्येकाने आपल्या घराबाहेर दिवे सुरू ठेवावे तसेच वर्गणी गोळा करून महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत अशी सूचना केली आहे.