
प्रतिनिधी एरंडोल – येथील रा. ति. काबरे विदयालयातील सन 1984 च्या दहावीच्या बॅचचे सर्व विदयार्थी तब्बल 47 वर्षांनी एकत्र आले . या वेळी झालेली गळाभेट ही डोळयांच्या कडा ओलावणारी ठरली . कोणत्या वळणावर माणसाला कोण कुठे भेटेल हे कोणालाही माहित नसते . संजय साळी या तत्कालीन विदयार्थ्याच्या डोक्यात एक कल्पना आली आणि त्याने आपला वर्ग मित्र हकीम बोहरी याच्या मदतीने आपल्या कल्पनेला मूर्त रुप दयायला सुरुवात केली . व्हॉटस ॲप वर एक गृप तयार केला . सगळयांना एकत्र जमण्याचे अवाहन केले आणि चमत्कार झाला. धडाधड गृपवर इतरही माजी विदयार्थी सामिल झाले . सगळयांच्या सोईची एक तारीख ठरवण्यात आली आणि दि. 20 रोजी एकुण 18 माजी विदयाथी हॉटेल कृष्णा मध्ये एकत्र जमले . ज्यांची ज्यांची ओळख पटत होती ते ते गळाभेट घेत होते . काहींच्या डोक्यावर चंद्र उदयास आल्याने ते ओळखले गेले नाहीत त्यांची ओळख पटवली जात होती . डोळयाच्या कडा पाणवत होत्या . हस्यांचे फव्वारे उडत होते.
कृष्णा महाजन व रघुनाथ सुतार हे दोघं मिट्रीमॅन , सुधाकर निकम, सेल टॅक्स अधिकारी , नंदादीप निकम शासन दरबारी अभियंता , अधिकार पाटील अभियांत्रीकी महाविदयालयात प्रोफेसर , कैलास वानखेडे शासकिय अभियांत्रीकी महाविदयालयात प्राचार्य , अनिल वाणी हे बॅकेतले कॅशीअर , जगदीश मोरे मार्केटींग मॅनेजर , प्रमोद बिर्ला घाऊक व्यापारी , हकिम बोहरी हार्ड वेअर व्यापारी , ॲड. विलास मोरे प्रशासकीय अधिकारी , शिवदास चौधरी हे वन विभागात अधिकारी, भगवान पाटील हे सहकार क्षेत्रातील व साहेबराव पाटील व प्रेमराज चव्हाण हे प्रगतीशील शेतकरी , अशोक चव्हाण हे फिजिकल रिचर हे सर्व महाराष्ट्राच्या कान्या कोप-यातून एकत्र आले . जवान ते किसान , प्रशासन ते विपणण असे सर्व क्षेत्रातील मित्र गेट टुगेदर च्या निमित्ताने एकत्र आले .
पदमालय येथील गणरायाच्या दर्शनानंतर सर्व माजी विदयार्थी साहेबराव पाटील यांच्या एरंडोल शिवारातील उत्राण रोड लगत असलेल्या ऑर्गेनिक शेतीत आले . तुडुंब भरलेले शेत तळे , चहुबाजूंनी डोलणारी डौलदार पिकं , निंबाच्या झाडाचा पार , वन भोजनाचा आनंद , गाणे , गप्पा गोष्टी , कौटुंबिक विचारपूस , अडी अडचणी आणि हास्य विनोदात संध्याकाळ केव्हा झाली हे ही लक्षात आलं नाही . शेतक-याला जगाचा पोशिंदा का म्हणतात याचा प्रत्यत साहेबराव पाटलांच्या कुटुंबाच्या आदरातिथ्यातून जाणवला .
रात्री मुक्कामाला बालपणाचे खेळ , काव्य , नाटय , शाळेतल्या आठवणी या सर्वांनी प्राजक्त फुलांची बहार आली. स्मृती सूमनांनी मने ओथंबून गेली . संजय साळीचा नट सम्राट आणि विलास मोरे यांच्या कवितांनी मैफीलीला रंगत आणली .
दुस-या दिवशी 21 रोजी सगळी मंडळी इ.स. पूर्व अजिंठा लेण्यांचा इतिहास आणि अभ्यास जाणून घेण्यासाठी अजिंठा येथे गेली . बौध्द धर्म तत्वज्ञान आणि तत्कालीन मानवी प्रगतीचा आलेख त्यानिमित्ताने सगळयांच्या डोळयासमोर आला . परतीच्या प्रवासात अजिंठयाच्या पायथ्याला घेतलेलं पर्वत पायथा भोजन म्हणजे एक वेगळीच मेजवानी ठरली .
दुस-या दिवसाची रात्र मात्र पुन्हा भेटण्याच्या आणाभाका आणि पुढील नियोजनातच गेली . सकाळी हकीम बोहरी यांनी सर्वाना आश्चर्याचा झटका देत एक मग्गा ( कप ) भेट दिला ज्यावर सर्व मित्रांच्या आदल्या दिवशी काढलेले फोटो चितारलेले होते . शिवदास चौधरी यांनी सर्व मित्रांच्या वैदयकीय तपासण्या केल्या .
एकमेकांना निरोप देतांना प्रत्येक जण भाऊक होता . भावकीच्या नात्याने तुडूंबलेला होता . हे गेट टुगेदर म्हणजे केवळ फॅशन किंवा औपचारीकता किंवा दिखावा न रहाता त्यात स्नेह भावना , प्रकृतीची काळजी , काहीतरी पुन्हा करण्याची जिदद , संकटात धावून जाण्याची वृत्ती , मदत देण्याची तळमळ यातून जाणवली ही विशेष बाब . जात, धर्म ,पंथ , पद आणि प्रतिष्ठा या पलीकडे जाऊन केवळ माणूसकी जपणारी अशी गेट टुगेगरं आज समाजभान जागृत करण्याला आणि ते जोडण्याला कारणीभूत ठरावीत.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृष्णा महाजन , रघुनाथ सुतार , जगदीश मोरे , भगवान पाटील , सुधाकर निकम , अनिल वाणी , नंदादीप निकम , अशोक चव्हाण , प्रेमराज चव्हाण , प्रमोद बिर्ला यांनी परिश्रम घेतले .