महाराष्ट्र

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक रद्द करा!” – अब्राहम आढाव..

प्रतिनिधी पुणे, २३ मार्च २०२५ – महाराष्ट्र सरकारने लागू करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयकाविरोधात आज पुण्यातील अलका चौक येथे विशाल जनआंदोलन करण्यात आले. सामाजिक संघटना, कार्यकर्ते आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले.

या आंदोलनाचे नेतृत्व करताना ज्ञानमाता सेवाभावी संस्थेचे संस्थापक अब्राहम आढाव म्हणाले, “या विधेयकाद्वारे सरकार जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत आहे. चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवणाऱ्या सामाजिक संघटनांना बेकायदेशीर ठरवण्याचा हा प्रयत्न आहे. नागरिकांनी आता जागरूक राहून संघर्ष केला नाही, तर लोकशाही धोक्यात येईल.”

महाराष्ट्र शासनाने या विधेयकासंदर्भात १ एप्रिलपर्यंत नागरिकांच्या सूचना व हरकती मागवल्या आहेत. मात्र, या कायद्यामुळे आंदोलन करणाऱ्या संघटनांवर कठोर कारवाईची तरतूद असल्याने, तो “नक्षलवाद निर्मूलनाच्या नावाखाली जनतेचे अधिकार संपवण्याचा डाव” असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

या आंदोलनात ज्ञानमाता माहिती अधिकार प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षणार्थी आणि पदाधिकारीही सहभागी झाले होते. अनेक सामाजिक संघटनांनी एकत्र येत हे विधेयक त्वरित रद्द करण्याची मागणी केली. शहीद दिनाचे औचित्य साधून हे आंदोलन सरकारला इशारा देण्यासाठी आयोजित करण्यात आले.

लोकशाहीच्या संरक्षणासाठी हे विधेयक थांबवणे अत्यंत गरजेचे असल्याचा ठाम निर्धार आंदोलकांनी या वेळी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button