अंजनी मध्यम प्रकल्प १ , २ व गिरणा पाटबंधारे विभाग कर्मचारी बनले “लेट लतीफ “.!

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्प १ , २ व गिरणा पाटबंधारे विभागातील अधिकारी व कर्मचारी नेहमीच कार्यालयात उशिरा असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
एरंडोल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्प १ , २ व गिरणा पाटबंधारे विभाग यांची कार्यालय कार्यान्वित आहेत. यापूर्वी एरंडोल तालुक्यात फक्त विभागाचे कार्यालय कार्यान्वित होते. तसेच सुमारे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून तालुक्याला नव संजीवनी देणारे अंजनी मध्यम प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर नागरिकांना सह शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण झाले. या दृष्टिकोनातून सध्या स्थितीत सदर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी नेहमी उशिरा किंवा दांड्या मारत असल्याने नागरिकांच्या आशेवर पाणी फिरण्याचे चित्र दिसून येत आहे. सरकारी वेळेनुसार सकाळी ९.४५ वा. कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहणे आवश्यक असून आठवड्यातून फक्त ५ दिवस या लोकांना काम करावयाचे असल्याचे असून देखील हे मंडळी वेळेवर आपले काम करत नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच कार्यालयात उपस्थित कर्मचारी येतात. यासाठी नागरिकांना फिरावे लागत आहे. मनस्ताप वाढत आहे त्यामुळे सदर लेट लतीफांवर व दांडी बहादुर वर योग्य ते कारवाई करून नागरिकांना वेळेवर सेवा देण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.