जळगावमहाराष्ट्र

बोगस शेतकरी दाखल्यांचा महाघोटाळा……!

अमळनेर : तालुक्यात बोगस शेतकरी दाखल्यांचा महाघोटाळा उघडकीस आला असून व्यापारी आणि दोन नम्बर व्यवसायवाले गुंतवणूक करण्यासाठी शेती खरेदी करत आहेत. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी याबाबत गांभीर्याने दखल घेतली असून बोगस खरेदी नोंदी रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.
सेतू केंद्र चालक व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बोगस दाखल्याचे रॅकेट चालवले जात आहे. व्यापारी आणि धनदांडग्यांना लाखो रुपये घेऊन नाम सदृश्य सात बारा शोधून अथवा तिसऱ्याच्याच नावावर असलेले सात बारा उतारे एडिट करून व्यापार्यांना शेतकरी दाखवले जात आहे. त्याच दाखल्यांच्या आधाराने गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. आणि अशा खरेदी केलेल्या जमिनीची तात्काळ नोंद देखील केली जात आहे. शेतकरी दाखल्याचा प्रस्ताव जोडताना बोगस उतारे , सेतू चालकाकडून याबाबत पडताळणी झाली पाहिजे त्यांनतर मंडळाधिकारी यांनी प्रस्ताव तपासून कागदपत्रांची खात्री केली पाहिजे तसेच प्रत्यक्ष पंचनामा केला पाहिजे मात्र असे झालेले दिसत नाही.
बोगस दाखल्याच्या बाबत माहिती कळताच उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी मंडळाधिकारीना बोगस नोंदी रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांच्या प्रशासकीय ग्रुपवर सर्व मंडळाधिकारीना निर्देश दिले असून जरी बोगस दाखल्यांवर शेती खरेदी झाल्या असतील तरी नोंदी मंजूर करताना खरंच खरेदीदार शेतकरी आहे का याची पडताळणी करावी. आणि बोगस दाखल्यावर खरेदी जरी झाली असेल तरी नोंद नामंजूर करावी. बोगस दाखल्याबाबत फिर्याद द्यावी तसेच कुळकायदा कलम ८४(क) अन्वये व्यवहार विधी अग्राह्य ठरवण्याचा प्रस्ताव तहसिलदारांकडे पाठवावा असे निर्देश दिले आहेत.
बोगस दाखल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली आहे. बोगस कागदपत्रांवर खरेदी झालेल्या जमिनी सरकार जमा करण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. याबाबत तहसीलदार काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button