एरंडोल ते शेगाव पायी वारीचे ३५ वे वर्ष ..

प्रतिनिधी एरंडोल;-येथील श्री साई गजानन संस्थान यांच्यामार्फत एरंडोल ते शेगाव पायी वारीचे आयोजन सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील करण्यात आले. या मंदिर संस्थानाचा मूलभूत पायाच पायी वारी आहे. २००४ या पायी वारीतच
मंदिराची संकल्पना अस्तित्वात आली होती व त्याच ठिकाणी वारकऱ्यांनी देणगी देऊन संस्थानाची निर्मिती केली. एरंडोल ते शेगाव पायी वारी ची सुरुवात एरंडोल येथून १९८६ पासून झाली. सदर पायी वारीचे आयोजन हे बापू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येते. यावेळी मंदिर संस्थानचे निर्मिती झाली नव्हती. मंदिर निर्मितीच्या पूर्वेपासून वारीही नित्याची जात आहे. व मंदिराची निर्मिती झाल्यानंतर बापू मोरे हे संस्थानाचे अध्यक्ष आहेत.
वारीचे विशेषणे म्हणजे दरवर्षी दत्त जयंती झाल्यानंतर पहिल्या शनिवारी वारी निघते. वारीचे नियोजन हे सहा दिवसांचे असते.सदर वारीत जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे मुंबई पर्यंत असणाऱ्या गावांचे वारकरी पायी वारीत येत असतात. प्रारंभीच्या पायी वारीमध्ये जवळपास १२०० वारकरी असायचे. परंतु आता पायी वारीने वटवृक्षाचे स्वरूप झाले आहे. काही वर्षापासून वारीत ८०० ते १००० वारकऱ्यांचा सहभाग असतो. विशेष म्हणजे या संस्थानातर्फे गेल्या दहा वर्षापासून महिला पायी वारी जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निघत असते. महिला वारी आठ दिवसांची असते. वारीत दोन ते तीन वेळा साधना केली जाते .
यावर्षी वारीचा कालावधी १५ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२४ आहे. वारीच्या आदल्या दिवशी शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येते गावात ठिकठिकाणी रांगोळ्या टाकून, फुलांची उधळण करून वारी जाण्याचे स्वागत केले जाते. ठिकठिकाणी आरत्या होतात. सकाळी लवकर वारी मंदिरातून प्रस्थान करते. वारीचे प्रस्थान हे वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीत होत असते.
वारी शहरातून निघत असतांना पायी वारकरी सोडून वारीसोबत वारकऱ्यांना पद्मालय पर्यंत शुभेच्छा देण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. वारी मार्गावर अनेक लोक चहा पण्याचा
बिस्किट वाटपाचा कार्यक्रम होत असतो.
वारी मार्ग. एरंडोल पद्मालय, विटनेर येथे पहिला मुक्काम, जामनेर येथे दुसरा मुक्काम, तिसरा मुक्काम बोदवड चौथा मुक्काम मलकापूर, पाचवा मुक्काम नांदुरा, सहाव्या दिवशी शेगाव गोमाजी मंगल कार्यालय. या मार्गाने वारी मार्गक्रम करत असते. या वारीदरम्यान सर्व व्यवस्था ही स्थानिक अन्नदाते आश्रद्धाते यांच्याकडून असते.
वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी सकाळचा चहा नाष्टा, दुपारचे जेवण, दुपारच चहा व रात्री चार सत्संग जेवण,मुक्काम यानुसार वारीमध्ये वारकऱ्यांची दिनचर्या असते. वारीचे वैशिष्ट्य म्हणजे या वारीत सकाळचा नाश्ता हा देखील अन्नदाते व दानशूर व्यक्ती करत असतात, त्याचप्रमाणे दुपारचे जेवण व दुपारचा चहा यासाठी देखील अन्नदाते असतात, रात्रीच्या सत्संगाची व मुक्कामाची,जेवणाची व्यवस्थादेखील स्थानिक अन्नदात्यांकडेच असते. ही वारी जणू काही या मार्गावर भक्तीची पर्वणीच असते. मोठ्या संख्येने अन्नदाते संस्थानाकडे अन्नदान करण्यासाठी नाव नोंदणी करत असतात.
, मंदिराची निर्मिती २००४ झाले असून या मंदिरात साईबाबा व गजानन बाबा यांच्या मूर्तींची स्थापना १३ एप्रिल २००७ झाली आहे. दोन संतांचा रहिवास एकाच मंदिरात असल्याने हे महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असावे असा दावा देखील केला जातो.