जळगावमहाराष्ट्र

उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा प्रशासनातर्फे एरंडोल नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांचा गौरव.

प्रतिनिधी एरंडोल- नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांचा माझी वसुंधरा अभियान सन 2024 -25 या आर्थिक वर्षात स्वच्छ भारत अभियानात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने गौरव करण्यात आला.


          दरम्यान एरंडोल नगरपालिकेने शहरात प्लास्टिक मुक्त अभियान, स्वच्छ गटारी,शहरातील प्रत्येक भागात दररोज साफसफाई करणे, हागणदारी मुक्त शहर ही योजना योग्य पद्धतीने राबवणे तसेच शहरातील कचरा संकलन करून त्यास कचरा डेपोमध्ये संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी राबविला जाणारा उपक्रम व असे अनेक स्वच्छतेचे उपक्रम सातत्याने राबवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियान सन 2024 -25 या आर्थिक वर्षात जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव अंतर्गत पार पडलेल्या शासकीय जबाबदारी मध्ये मुख्याधिकारी नगर परिषद एरंडोल अमोल बागुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देऊन यांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी  जिल्हाधिकारी आयुष प्रसाद,आमदार राजू मामा भोळे,आमदार किशोर पाटील तसेच एरंडोल नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक जीवन जाधव,आरोग्य निरीक्षक अनिल महाजन,संबंधित अधिकारी पदाधिकारी कर्मचारी उपस्थित होते. एरंडोल नगरपरिषदेस सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे तसेच सदर कामगिरीस सातत्य असावे असे नागरिकांची अपेक्षा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button