वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत या प्रमुख मागणीसाठी उबाठा शिवसेना गटातर्फे तहसीलदारांना निवेदन.

प्रतिनिधी एरंडोल – येथे ११ जून २०२५ रोजी वादळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.शासनाने सरसकट पंचनामे करावेत.या प्रमुख मागणीसाठी उबाठा शिवसेना गटातर्फे आज १३ जून २०२५ रोजी तहसीलदारांना निवेदन तालुका प्रमुख रविंद्र चौधरी , रमेश महाजन यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती देण्यात आले.
निवेदनात फरकांडे येथील नारायण सिताराम पाटील व रिंगणगांव येथील जगन रोहिमारे यांचा वादळी पावसामुळे मृत्यू झाला.त्यांच्या परिवारास शासनाकडून आर्थिक मदत मिळावी.खेडगांव तांडा येथील ७० टक्के नुकसान झाले.त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी.
तसेच तालुक्यातील ज्वारी खरेदीचे उद्दीष्ट ३ हजार क्विंटल ऐवजी १० हजार क्विंटल करावे.८ महिन्यांपासून संजय गांधी, श्रावणबाळ योजनेचे अनुदान लाभार्थ्यांना मिळाले नाही.ते त्वरित मिळावे असे निवेदनात नमूद केले होते
. किशोर महाले, गोरख पाटील, मधुकर महाजन, संतोष पाटील अनिल पाटील शिवाजी महाराज, वसंत माळी नारायण माळी, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवेदनावर सह्या होत्या.