युवासेनेच्या जिल्हा समन्वयकांसह माजी नगरसेवकासह शेकडो पदाधिका-यांचा
शिंदे गटात प्रवेश.

प्रतिनिधी एरंडोल-शिवसेना ठाकरे गटाचे युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल महाजन,माजी
नगरसेवक रुपेश माळी,युवासेनेचे शहरप्रमुख जयेश महाजन,शहर संघटक नितीन
महाजन यांचेसह शेकडो शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार अमोल पाटील यांचे उपस्थितीत
शिंदे गटात प्रवेश केला. उबाठा शिवसेनेच्या पदाधिका-यांनी शिंदे गटात
प्रवेश तालुक्यात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडले आहे.

उबाठा ठाकरे गटाचे युवासेनेचे जिल्हा समन्वयक अतुल
महाजन,उपतालुकाप्रमुख अनिल महाजन,माजी नगरसेवक रुपेश माळी,युवासेनेचे
शहरप्रमुख जयेश महाजन,शहर संघटक नितीन महाजन यांचेसह राहुल माळी,भरत
महाजन,राजेश महाजन,आबा नेरकर,सचिन महाजन,हिलाल माळी,हेमंत महाजन,लालू
भेलसेकर,सागर महाजन या प्रमुख पदाधिका-यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मुंबई
येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री गुलाबराव पाटील,आमदार अमोल
पाटील,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील यांचे उपस्थितीत शिवसेनेत
प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सर्व पदाधिका-यांचे स्वागत
करून सत्कार केला.आगामी काळात होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकीच्या दृष्टीने पदाधिका-यांच्या प्रवेशास विशेष महत्व प्राप्त झाले आहे.दरम्यान युवासेनेचे जिल्हा समन्वयक माजी नगराध्यक्ष देविदास
महाजन यांचे पुत्र असून माजी उपनगराध्यक्षा आरती महाजन यांचे पती आहेत.रुपेश माळी माजी नगरसेवक असून युवक कार्यकर्त्यांचे मोठे संघटन त्यांनी केले आहे.शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश
केल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठा भूकंप झाल्याचे बोलले जात आहे.यापूर्वी देखील ठाकरे गटाच्या अनेक प्रमुख पदाधिका-यांनी राजीनामे दिले असून ते देखील सत्ताधारी महायुतीतील एका प्रमुख पक्षात प्रवेश करण्यासाठी नियोजन
करीत आहेत.विरोधी पक्षातील पदाधिका-यांना प्रवेश देतांना पक्षाच्या निष्ठावान पदाधिका-यांना विश्वासात घेतले जावे अशी प्रतिक्रिया
कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.दरम्यान लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांविरोधात विशेषत: आमदार अमोल पाटील आणि माजी आमदार चिमणराव पाटील यांचे कार्यपद्धतीवर प्रचारसभांमध्ये अत्यंत
आक्रमक शैलीत टीका करून गंभीर आरोप करणा-या प्रमुख पदाधिका-यांनी केवळ
चारच महिन्यात आपल्या भूमिकेत बदल करून आजी,माजी आमदारांचे नेतृत्व मान्य
केले आहे.शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिका-यांबद्दल तालुक्यातील
राजकीय क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
