जळगावमहाराष्ट्रश्रध्दांजली
शास्त्री फार्मसी महाविद्यालया तर्फे पहलगाम येथील मृत्युमुखी पडलेल्या भारतीय पर्यटकांना श्रद्धांजली.

प्रतिनिधी – दि. 22 रोजी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय पर्यटकांना शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी दहशदवादी हल्ल्याचा निषेध करून भविष्यात असल्या प्रकारचे हल्ले होऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचे म्हणाले, महाविद्यालयाच्या वतीने त्या बाबत निवेदन लवकरच राज्यसरकार व केंद्र सरकारला पाठवण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रमासाठी प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, सचिव सौ. रूपा शास्त्री यांचे मार्गदर्शन लाभले. वरिष्ठ प्रा. जावेद शेख तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.