रेल्वे अपघातात जवानाचा मृत्यू.

प्रतिनिधी – एरंडोल भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले गणर जयवंत दिलीप परदेशी GNR (Aarmy no-21022154x) जवान हे आपल्या आजी-आजोबांच्या भेटीसाठी श्रीरामपूर येथे गेले असताना 16 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वाजता रेल्वेची धडक लागल्याने रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला.तर
शहीद वीर जवान जयवंत दिलीप परदेशी यांचा दशक्रिया विधी कार्यक्रम आज दि.२५ जानेवारी रोजी दोंदवाडे येथे संपन्न झाला व तेरवीचा बछडी चा कार्यक्रम हा मंगळवार दिनांक 22.01.2025 रोजी 9.30 वाजता आपल्या मूळ दोंदवाडे ता. जामनेर जिल्हा जळगाव या गावी होणार आहे.
सदर घटना घडल्यावर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन इन्स्पेक्टर नितीन देशमुख यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची नोंद घेऊन जवानाचे पार्थिव शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूर येथे पाठवले. सेनेतील जवानाचे पार्थिव त्यानंतर कायदेशीर सोपस्कार करून सन्मानपूर्वक त्यांच्या कुटुंबाकडे सुपूर्द केले. जवानाचे नाव गणर जयवंत दिलीप परदेशी असून ते कलकत्ता येथे GNR (Aarmy no-21022154x) कार्यरत होते.
गणर- जयवत दिलीप परदेशी सुट्टीमध्ये श्रीरामपूर येथे मात्र अचानक समोरून येणारया गाडीची धडक लागल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागेच मृत्यू झाला. पोलीस अधिकारी भडकवाड यांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांनी भारतीय सैन्य दल कलकत्ता येथे आणि त्यांच्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर त्यांचे कुटुंब पार्थिव घेण्यासाठी श्रीरामपूर येथे दाखल झाले असता भारतीय सैन्य दलातील जवानांनी व महाराष्ट्र पोलीस विभागाकडून सन्मानपूर्वक मानवंदना देत त्यांच्या पार्थिवावर त्यांच्या राहत्या गावी दोंदवाडे तालुका जामनेर जिल्हा जळगाव या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी 17 जानेवारी 2025 रोजी 7.15 वाजता शासकीय इतमामात समाजाच्या चालीरीती प्रमाणे करण्यात आला.
या दुर्दैवी घटनेबाबत नामदार गिरीश महाजन (मंत्री.महाराष्ट्र राज्य)यांच्या सौ.पत्नी साधनाताई महाजन यांच्याकडून कुटुंबीयांचे सात्वन करण्यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन कुटुंबाला धीर दिला.
वीर जवान जयवंत परदेशी आपल्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती होती. त्यांच्या पश्चात आई-वडील व एक बहीण असा त्यांचा परिवार आहे.