जळगावमहाराष्ट्र

शास्त्री फार्मसी महाविद्यालयात राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धा उत्साहात साजरी.

प्रतिनिधी – येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज्यांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालया तर्फे राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य अतिथी म्हणून एरंडोल मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोल चिमणरावजी पाटील, युवासेनेचे जिल्हा प्रमुख  मनोज  पाटील (पेहलवान), डी डी एस पी महाविद्यालयाचे अध्यक्ष  अमित पाटील, माजी नगराध्यक्ष  रमेशसिंग परदेशी, माजी नगरसेवक डॉ. सुरेश  पाटील हे उपस्थित होते.

      कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाआरतीने करण्यात आली. राज्यस्तरीय पोवाडा स्पर्धेत महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, निवडक पंधरा सहभागी विद्यार्थ्यांना आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाविद्यालयात आपली कला सादर करण्याची संधी देण्यात आली. यावल येथील महात्मा गांधी कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मधील महेश सपकाळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला, जळगाव शासकीय फार्मसी महाविद्यालयाचे अनिकेत तुपे द्वितीय तर आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालय शिरपूर येथील कल्याणी बोरसे तृतीय स्थान पटकावले. विजेत्यांना रोख रक्कम रुपये ५००१ प्रथम, ३००१ द्वितीय व २००१ तृतीय पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. शास्त्री महाविद्यालयाचे खेमचंद पाटील, बालविश्व इंग्लिश मिडीयम शाळा, जळगाव येथील ऐश्वर्या पाटील व सेंट मेरी पब्लिक स्कूल टोळी येथील विधी पाटील याना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी बोलताना आमदार  अमोल चिमणरावजी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेऊन त्यांचे कर्तृत्व अंगीकारणे विद्यार्थ्यांसाठी व पर्यायाने देशाच्या उत्कर्षा साठी कसे महत्वाचे असल्याचे सांगितले, प्रत्येक विद्यार्थ्याने महाराजांचे संस्कार घेण्यासाठी रणजित देसाई लिखित श्रीमान योगी या पुस्तकाचे वाचन करावे असा सल्ला दिला. अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी महाराजांची शिस्तबद्धता अंगीकारून आचरणात आणल्याने उज्वल भविष्याच्या दिशेने होणाऱ्या प्रगतीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या नियोजनाचे संस्थेच्या मा. सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आले, सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा शिवदे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. योगेश्वरी लोहार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी सोबत प्रा.जावेद शेख, प्रा. मंगेश पाटील व प्रा. राहुल बोरसे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button