
प्रतिनिधी एरंडोल – शहर व तालुक्यातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट या पक्षाच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे मंत्री नामदार गिरीश महाजन ,प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे यामुळे उभाठा शिवसेना सह राष्ट्रवादी काँग्रेसला (शप) खिंडार पडले आहे. यात प्रामुख्याने विधानसभेत अपक्ष उमेदवारी प्रमुख उमेदवार यांच्याही समावेश आहे .
यावेळी माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील,माजी नगरसेवक सुनील पाटील,जिल्हा सरचिटणीस निलेश परदेशी,पिंटू राजपूत यांचेसह स्थानिक
पदाधिकारी उपस्थित होते.शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या पदाधिका-यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे दोन्ही पक्षांना मोठे खिंडार पडले आहे.पंधरा दिवसात तालुक्यातील अनेक प्रमुख पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.दरम्यान पदाधिका-यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशाचे राजकीय वर्तुळातून वेगवेगळे अर्थ लावण्यात येत आहेत.
एरंडोलचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी,किशोर निंबाळकर,दशरथ
महाजन,पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप रोकडे,माजी उपनगराध्यक्ष संजय
महाजन,शिवसेना ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख प्रमोद महाजन,संदीप बोढरे,पांडुरंग महाजन,राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार,शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आनंदा चौधरी
(भगत),एरंडोल विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवून चाळीस
हजाराच्या वर मते मिळवणारे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भगवान महाजन यांनी असंख्य समर्थकांसमवेत भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.यापूर्वी देखील शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख
पदाधिका-यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटासह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठे खिंडार पडून
त्यांचे संघटन विस्कळीत झाले आहे.माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेचा राजीनामा दिला होता.त्यांच्या पत्नी मीना चौधरी देखील माजी नगराध्यक्षा आहेत.किशोर निंबाळकर हे देखील माजी नगराध्यक्ष असून सुमारे वीस वर्ष नगरसेवक होते.शिवसेना ठाकरे गटाचे
निष्ठावान पदाधिकारी म्हणून त्यांची ओळख होती.दशरथ महाजन हे देखील माजी
नगराध्यक्ष असून शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख होते.राष्ट्रवादी
कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार यांची
.जिल्हा परिषदेच्या कासोदा आडगाव गटावर त्यांचे वर्चस्व आहे.माजी
दिलीप रोकडे पंचायत समितीचे माजी सभापती असून त्यांच्या आईने देखील
सभापतिपद सांभाळले होते.भगवान महाजन यांनी एरंडोल विधानसभा मतदार संघातून
अपक्ष निवडणूक लढवून चाळीस हजाराच्या वर मते मिळवली होती.आगामी काळात
होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
शिवसेना ठाकरे गट,राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या
पदाधिका-यांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशास विशेष महत्व प्राप्त झाले
आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या
पदाधिका-यांमुळे पक्षाला किती लाभ होऊ शकतो याबाबत राजकीय वर्तुळात
उलटसुलट चर्चा सुरु आहे. सहा
महिन्यातच पदाधिका-यांचे मतपरिवर्तन होऊन त्यांनी भाजपचे नेतृत्व मान्य
केले आहे. तालुक्यात होणाऱ्या 15 दिवसा पासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या युतीमध्ये होता की स्वबळावर आता याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.